ब्लूव्हेल ह्या online
खेळाची चर्चा चालू असताना तंत्रज्ञानाचा अतिरेक असे ताशेरे मारले जातात. ग्याझेट आणि
त्याबबतची वाढत चाललेली व्यसनाधीनता हि इतर व्यसनांपेक्षा जास्त हानिकारक ठरत आहे.
माणसाने तंत्रज्ञान बनवलं पण हेच तंत्रज्ञान प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवत
आहे. प्रत्येक प्रगतीच्या मागचे हानिकारक पडसात कालांतराने कळायला लागतात सुरवातीला
सर्व गोष्टी हव्याहव्याश्या वाटतात नंतर त्याच्या अतिरेकामुळे त्या नकोश्या
वाटायला लागतात. तसच काहीसं ह्या मोबाईल च्या बाबतीत झालं आहे, जसजशी त्यामध्ये
प्रगती होत गेली तसे त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले. योग्य त्या वापरा ऐवजी इतर
निरुपयोगी वापर जास्त प्रमाणत होऊ लागला. संपर्कासाठीचं उत्तम उपकरण असूनही एक अवघड
जागेचं दुखणं होऊन बसलं आहे. जगभरातील सर्व माहिती एका क्लिक वर मिळायला लागली आहे
हे खरं पण जवळची माणसं लांब जाऊ लागली आहे. मोबाईल एक उपकरण न राहता एक जीवानावाश्यक
वस्तूं ह्यांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. ह्याला जबाबदार कोण ???? तर आपण...
ग्याझेट चा अति वापर आणि
त्याचे मानवी जीवनावर आणि मनावर होत असलेले परिमाण पाहता आपण प्रगती पेक्षा अधोगतीचा
मार्ग अवलंबलेला दिसतो. मोबाईल वरील खेळ हा एक त्यामधील मुख्य घटक आहे. नजर खिळवून
ठेवणारे हजारो online games आज मोबाईल वर मिळतात. वास्तव आणि अवास्तव ह्या मधील
फरक त्यामुळे नाहीसा झालेला दिसतो. एका वेगळ्या स्वप्नमय जगात नवीन पिढी वावराताना
दिसते ज्यामुळे खऱ्या व सच्च्या जगाशी त्याचं नातं तुटलेलं वाटतं. ब्लूव्हेल गेम खेळ तयार करणाऱ्यांचं इथेच फावतं, तुटत चाललेले संवाद ह्याला कारणीभूत आहेत.
बऱ्याच वेळेच आपण पाहतो ट्रेन किव्हा बस मध्ये प्रवास करताना ५०% लोकं मोबाईल वर
काही न काही तरी करत असतात. कोणाला कोणाशी बोलायला वेळ नाही. कधी कधी बाजूला बसून
whatsapp वर चर्चा चालतात आणि कोणाचा चुकून धक्का लागला तर वादच सुरु होतो मग
संवाद तर दूरच. हाच संवाद पुन्हा साधायचा असेल तर आपल्याला आधीच्या काळात डोकवावे
लागेल. ज्या कळात लोकं अल्पसंतुष्ट असूनही सुखी होती कुठलेही दडपण नव्हतं आणि ह्या
सर्वांची बीजं त्यांच्या बालपणात रुजली गेली होती. त्यांचा IQ (Intelligent Quotient) बरोबरच EQ (Emotional Quotient) हि तितकाच चांगला असे. त्यांचे बालपणीचे
खेळ हे आजच्या online खेळा पेक्षा कित्येक पटीने चांगले होते कारण त्या खेळांमध्ये संवाद असे. आज कित्येकांनी कॅरम खेळणं देखील सोडलं आहे जे प्रत्येक घरात खेळत असत. जर आपण बदलायचे ठरवले तर बदल नक्कीच घडू शकतो फक्त आता एक पाऊल पुढे न टाकता मागे
टाकायला हवे.
ब्लूव्हेल हा खेळ निम्मित
मात्र आहे खरी गरज आहे ती म्हणजे ह्या बाबतचं प्रबोदन होण्याची. खेळ काय येतच राहतील
पण ह्या बाबत आपण सर्व सतर्क राहिलो तरच आपण तरले जाऊ. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता योग्यत्या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. तांत्रिक विकास गरजेचा आहे पण तो
ही मनुष्याची हानी न होऊ देता म्हणूनच गरजेचा आहे तो एक संवाद.