चतुरंग
साजी चतुरंग वीर रंगमे तुरंग चढी.....ह्या अलंकारबद्ध ओळीत चतुरंग म्हणजे चतुरंग सैन्य ज्या मध्ये पायदळ, घोडदळ, उंट आणि हत्ती आहेत आणि हे सैन्य घेऊन एक राजा लढाईस निघाला आहे. हेच प्रतीकात्मक चतुरंग सैन्य एका पटावर मंडलं तर त्याचा एक पुरातन खेळ होतो तो म्हणजे “चतुरंगा”.
८ X ८ च्या चौरस बुद्धिबळा सारख्या पटावर खेळला जाणारा हा खेळ दिसायला जरी आजच्या युगातील बुद्धीबळा सारखं असला तरी ह्या खेळाचे नियम वेगळे आहेत. हा खेळ दोन जणां मध्ये खेळण्या ऐवजी चौघांमध्ये खेळला जातो. जोडीने खेळला जाणारा हा खेळ सुमारे ३९०० वर्ष जुना आहे असे काही दंतकथा मधून निष्कर्ष काढला जातो तसेच ह्या खेळाचा उल्लेख ‘भविष्य पुराण’ ह्या ग्रंथात आढळतो. भारतात ह्या खेळाचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आले आहे. एका दंतकथे नुसार हा खेळ मंदोदरी म्हणजेच लंकाधीश रावण ह्यांची भार्या ह्यांनी बनवला आहे असे मानले जाते. भविष्य पुराणातील एका सूची वरून व्यास ऋषी ह्यांनी ह्या खेळाचे वर्णन करताना सूर्याची उपमा देऊन लाल, हिरवा, पिवळा आणि काळ्या हे प्रतिस्पर्ध्यांचे रंग म्हणून वापरलेले आहेत.
राजा, हत्ती आणि घोडा हे समान्य बुद्धीबळा सारखे चाल करतात. उंट मात्र पटावरील कुठल्याही सैन्यावरून उडी मारू शकतो. राजा, हत्ती आणि घोडा हे एकमेकांना व उंट आणि प्याद्याला चीत करू शकतात. पण ह्या उलट उंट आणि प्यादे हे एकमेकांशिवाय दुसऱ्या कोणालाही चीत करू शकत नाही. हा खेळ पासे (Dice) वापरून खेळला जातो त्याला “डल्ला” असे देखील म्हणतात. डल्ला च्या चारी बाजूस १, ३, ४ आणि ६ टिंब असतात. एक अंक पडले तर उंट चालतो, तीन असतील तर घोडा चालतो, चार असतील तर हत्ती चल करतो आणि सहा अंक पडलेले असतील तर राजा किव्हा प्यादा चालतो. प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही राजे जेव्हा मारले जातात तेव्हा खेळ संपतो. checkmate सारखे प्रकार ह्या खेळत होत नाही. आधुनिक बुद्धिबळाचा हा भारतीय खंडातील जुना प्रकार असून देश विदेशातील अभ्यासकांनी ह्या खेळाचा अभ्यास केला आहे. सर विल्यम जोन्स ह्यांनी ह्या खेळावर एक लेख १७८८ मध्ये प्रसिद्ध केला होता. चार बाजूनी खेळला जाणारा हा खेळ म्हणूनच कि काय “चारो खाणे चीत” हा वाक्यप्रचार रुजू झाला. भारताप्रमाणे इतर देशात म्हणजे इटली, जपान चीन मध्ये ह्याच chess चे विविध प्रकार पाहायला. LUDUS हा खेळ देखील बुद्धिबळाचा एक प्रकार आहे. बुद्धीला चालना देणारा डाव पेच शिकवणारा आणि नियोजन कौशल्य वाढवणारा हा खेळ कालानारूप बदलत गेला आणि अस्तित्व हरवून बसला.
चतुरंग...चदुरंग...शतरंग आणि शतरंज ही बदलत गेलेली नावे तर नाहीत ? हे कोडं काही सुटलेले नाही.
No comments:
Post a Comment